नगर – आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे, तरी आपल्याला महिला सबलीकरणाचे उपक्रम राबवावे लागतात. खरतर महिलांना आज आरक्षणाच्या कुबड्या घेण्याचीही गरज नाहीये कारण महिला इतकी सक्षम व शक्तिमान व्यक्ती जगात कोणीच नाही. नुसताच पुरुषांनीच महिलेला आदर देऊन चलणार नाही, तर घरात व समाजात वावरतांना महिलांनीही एकमेकींना आदर दिला पाहिजे.
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधीसेवा प्राधिकरण काम करत तळागाळातील नागरिकांच्या न्याय व हक्का साठी जनजागृती करत आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश रेवती देशपांडे यांनी केले.
जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने पेमराज सारडा महाविद्यालयात महिला सशक्तकारणासाठी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा सरकारी वकील ऍड.सतीश पाटील. सेंटर बार असोसिएशचे अध्यक्ष ऍड. सुभाष काकडे, पेमराज सारडा महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. अनंत फडणीस, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजयमाला माने, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अधिक्षक मोहिनीराज घावटे, महिला सचिव ऍड. राणी भूतकर आदींसह वीवीध क्षेत्रताल्या महिला उपस्थित होत्या. या शिबिरात व्याख्यात्या कायदेतज्ज्ञ ऍड. प्रज्ञा हेंद्रे यांनी विवाह विषयक विवध कायद्यांची सविस्तर माहिती दिली.
तर ऍड. सारिका खाकाळ यांनी राष्ट्रीय महिला आयोग, जिल्हा विधिसेवा प्रधीकरणाच्या सेवा व मालमत्ता अधिकार याबाबतच्या कायद्यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी ऍड. पाटील म्हणाले, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या सचिव म्हणून पदभार घेतल्यानंतर न्यायाधीश रेवती देशपांडे यांनी प्रथम महिलांसाठी जनजागृतीचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवल्या बद्दल त्यांचे अभिनंदन.