पुणे: दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज लागला आहे. यावर्षी निकालाची टक्केवारी २२.८६टक्के लागला असून, गत वर्षीच्या तुलनेत निकालात ०.८० टक्क्यांनी घसरण झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.
दरम्यानच ९ विभागीय मंडळामधून २ लाख २१ हजार ६२९ विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. त्यामधून ५० हजार ६६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १७ ते ३० जुलै दरम्यान ही लेखी परीक्षा घेण्यात आली होती. अनेक विद्यार्थी हे १ किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत परंतु या विद्यार्थ्यांना एटीकेटी सवलतीद्वारे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी घेता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली
विभागानुसार लागलेल्या निकालाची टक्केवारी –
पुणे – १८.१२, मुंबई – १४.४८, नाशिक – २५.०८, औरंगाबाद – २८.२५, कोल्हापूर – १५.१७, लातूर – ३१.४९,नागपुर – ३०.८९, अमरावती – २९.५३, कोकण – १५.८१.