सातारा – उत्तर कोरेगावमध्ये ऑगस्ट व ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची लाखोंची हानी झाली होती. शेतकऱ्यांना शेतीपिकांची सरसकट नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून तात्काळ नुकसान भरपाई देऊन आधार द्यावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
उत्तर कोरेगाव तालुक्यातील शेतकरी विविध समस्यांनी हैराण झालेले असतानाच ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडेच
सातारा शहरातील ओढ्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे ओढे मुजले आहेत. यामुळे पावसाळ्यात गोडोली परिसरातील अनेक दुकाने पाण्याखाली असतात. त्रिशंकू भागातील सांडपाणी रस्ते, तसेच ओढे अतिक्रमणांनी वेढले असल्याचे निदर्शनास आणले. भुयारी गटार कामाची प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनीच पाहणी करावी, असे सुचवण्यात आले. काही हॉटेलचालक उर्वरित खाद्यपदार्थ महामार्गालगत उघड्यावर टाकत असल्याने कचऱ्याचे साम्राज्य होऊन दुर्गंधी पसरते,असेही सांगण्यात आले.
उत्तर कोरेगावमधील पिंपोडे बुुद्रुक जिल्हा परिषद गटात गतवर्षी अतिवृष्टीने हाहाकार माजवला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेली पिके नष्ट झाली. प्रशासनाच्यावतीने पंचनामे झाल्यानंतर मदत मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र अद्याप मदत मिळाली नसल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. ना. बाळासाहेब पाटील यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असून शेतकऱ्यांना आधार मिळवून देण्यासाठी कायम कार्यरत राहणार आहे.
मंगेश धुमाळ, कृषी व पशुसंवर्धन सभापती, जिल्हा परिषद, सातारा.