शिक्रापूर/रांजणगाव – सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. महाराष्ट्रभर अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, फळझाडांसह आदी नुकसान झाले आहे.
अनेक गरीब कुटुंबांची घरे उद्ध्वस्त होऊन कुटुंब बेघर झाली आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी केली. यावेळी शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत केली आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व गरीब कुटुंबाचे झालेले नुकसान लक्षात घेता त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या भरपाईची मागणी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शेवाळे यांना महाराष्ट्रातील ज्या ज्या जिल्ह्यात नुकसान भरपाई झाली असेल तेथे सर्वांना मदत दिली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.