मुंबई – आशियाई क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती झाल्यावर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले आहेत. आशिया खंडातील क्रिकेटच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणार असून, या खेळाला तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी बीसीसीआयच्या माध्यमातून सातत्याने नियोजन करणार आहे, असे शहा यांनी म्हटले आहे.
बीसीसीआयने देशभरात क्रिकेटला पोहोचवले, खेळाडूंना स्थैर्य दिले, नव्या गुणवत्तेला न्याय दिला. आता हेच कार्य आशियाई स्तरावर करायचे असून, त्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असेही शहा यांनी सांगितले.