इस्लामाबाद- गेल्या आठवड्यात भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कमल 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानचा तिळपापड होत आहे. पाकिस्तानवर चीनव्य़तिरिक्त अन्य देशांनी लक्ष न दिल्याने इम्रान यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) टीकास्त्र सोडले आहे. 370 रद्द केल्यापासून पाकिस्तान पूर्णपणे अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे या मुद्द्याकडे लक्ष वेढण्याचा हरऐक प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे.
I am afraid this RSS ideology of Hindu Supremacy, like the Nazi Aryan Supremacy, will not stop in IOK; instead it will lead to suppression of Muslims in India & eventually lead to targeting of Pakistan. The Hindu Supremacists version of Hitler’s Lebensraum.
— Imran Khan (@ImranKhanPTI) August 11, 2019
इम्रान खान म्हणाले कि, “आरएसएसच्या हिंदू वर्चस्ववादाच्या विचारसरणीची आपल्याला भीती वाटतेय कारण नाझी विचारसरणीप्रमाणे असलेल्या संघाच्या विचारसरणीमुळे आज काश्मीरमध्ये जमावबंदीची स्थिती आहे. असं इम्रान खान यांनी म्हंटल आहे.
Heights of frustration from d ringleader of global terror empire Pakistan. Threat to democratic world is from Pak-sponsored Jehadi terror, not from India. We have undone Jinnah’s Two Nation theory n Sheik Abdullah’s Three Nation theory today. Can IK end religious fascism in Pak? https://t.co/yBiPl9qmmD
— Ram Madhav (@rammadhavbjp) August 11, 2019
मात्र, इम्रान खान यांच्या ट्विटरवर भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी देखील प्रत्यूत्तर दिले आहे. ‘आम्ही जिन्नांच्या दोन देश आणि शेख अब्दुल्लांच्या तीन देशांच्या सिद्धांताला संपविले आहे. इम्रान खान यांनी भारतामध्ये लक्ष घालण्यापेक्षा पाकिस्तानातील धार्मिक अतिवादाला संपवून दाखवावा?’. असे राम माधवन म्हणाले.