सातारा – जिल्ह्यात काल गुरूवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 801 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर 17 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळींची एकूण संख्या 5003 इतकी झाली आहे. तसेच जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून आणि विविध करोना केअर सेंटरमधून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 1341 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
आजच्या करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि आजअखेर बाधित रुग्णांची एकूण संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे. जावळी 21 (8992), कराड 274 (31927), खंडाळा 29 (12411), खटाव 57 (20645), कोरेगाव 71 (18029), माण 40 (13833), महाबळेश्वर 6 (4413), पाटण 29 (9250), फलटण 50 (29438), सातारा 168 (42973), वाई 40 (13460) व इतर 16 (1521).
जिल्ह्यात आजअखेर बाधितांची एकूण संख्या दोन लाख सहा हजार 892 इतकी झाली आहे. तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची तालुकानिहाय संख्या आणि आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे.
जावळी 0 (186), कराड 9 (956), खंडाळा 0 (156), खटाव 2 (493), कोरेगाव 2 (389), माण 0 (288), महाबळेश्वर 0 (85), पाटण 0(312), फलटण 1 (488), सातारा 3 (1270), वाई 0 (309) व इतर 0 (71). आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5003 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.