मुंबई – राज्यात काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्यांमध्ये मोठी घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तीन दिवसांपासून करोना रुग्णवाढीचा आलेख सातत्याने घसरत आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात रविवारी 3 हजार 502 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत राज्यात 9 हजार 815 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
राज्यात सध्या 45 हजार 905 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 76,49,669 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.54 टक्के एवढे झाले आहे.