१४ फेब्रुवारीला अभिव्यक्ती संस्थेने आयोजित केलेल्या वन बिलियन रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी ‘संविधान वाचवा एनआरसी हटवा’ यासोबतच ‘बोल सहेली जोर से बोल संविधान के समर्थन मे बोल’ अशा घोषणा देत अलका टॉकीज ते संभाजी गार्डन पर्यंत रॅली काढली आणि यामध्ये मोठ्या संख्येने विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
जगभरात १४ फेब्रुवारी हा प्रेम दिवस म्हणून साजरा केला जातो, पण वन बिलियन राईसिंग रॅली ही विविध संस्थांच्या सहकार्याने महिलांच्या अन्यायाविरुद्ध जगभर आवाज उठवते. सुरुवातीला केवळ स्त्रियांना न्याय मिळावा या हेतूने सुरू केलेले कार्य आता देशात एकता प्रस्थापित व्हावी यासाठी ही संस्था कार्यरत आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यांतच महिलांवरील अत्याचारांची संख्या ही अधिक प्रमाणात वाढली आहे, आणि याच पार्श्वभूमीवर महिलांनी पुढे यावे आणि आवाज उठवावा अशी मागणी या रॅलीत केली गेली.
आजचा तरुण हा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याबरोबरच अशा रॅली मध्ये सहभाग घेत आहे हे कौतुकास्पद आहे आणि इतर तरुणांना प्रेरणादायी आहे !
– भारती उबाळे,
कॉलेज रिपोर्टर,
आबासाहेब गरवारे महाविद्यालय