जुन्नर/नारायणगाव – जुन्नर तालुक्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि थंडीच्या कडाक्यामुळे शेळ्या-मेंढ्या दगावल्याने मोठे नुकसान झाले आहेत. ज्यामुळे या भागातील पशुपालक आणि मेंढपाळ धास्तावले आहेत. नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्नर तालुक्यात एकूण 743 शेळ्या-मेंढ्या तसेच 4 गाई मृत्युमुखी पडल्या आहेत.
जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद या ठिकाणी अवकाळी पावसाने व थंडीने सर्वात जास्त 119 मेंढ्या, 10 शेळ्या व 1 गाय मृत्युमुखी पडली आहे. त्याखालोखाल गोळेगाव येथे 57, तर आळे येथे 56 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.
जुन्नर तालुक्यातील 36 गावांमध्ये 747 पशुधन अवकाळी पाऊस व थंडी मूळे मृत्युमुखी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनीही अधिकारी व पदाधिकारी यांच्यासह नुकसानग्रस्त भागांना भेट शेतकरी व मेंढपाळ याना धीर दिला. या आपत्तीने मेंढपाळ हताश झाले होते.
गावनिहाय आकडेवारी
शिरोली खुर्द (13 मेंढ्या), सावरगाव (27 मेंढ्या), बोरी (14 मेंढ्या), निरगुडे (27 मेंढ्या), ओतूर (87, मेंढ्या), आळे (2 गाय, 6 शेळ्या, 48 मेंढ्या ), राजुरी (45 मेंढ्या), बोतारडे (12 मेंढ्या), खामुंडी (34 मेंढ्या), कांदळी (1 शेळी, 3 मेंढ्या), वडगांव (1 गाय, 2 शेळ्या, 14 मेंढ्या), मांजरवाडी (20 मेंढ्या), हिवरे तर्फे नारायणगाव (12 मेंढ्या), खोडद (25 मेंढ्या), ओझर (8 मेंढ्या), येडगाव (7 मेंढ्या), निमगाव तर्फे म्हाळुंगे (2 मेंढ्या),
वडगांव आनंद (1 गाय, 10 शेळ्या, 119 मेंढ्या), गोळेगाव (57 मेंढ्या), सुराळे (5 मेंढ्या), हिवरे तर्फे हवेली (6 मेंढ्या), धामणखेल (7 शेळ्या), दातखीळवाडी (1 मेंढी), बेल्हे – 14 मेंढ्या, गुळुंचवाडी (1 शेळी, 6 मेंढ्या), पिंपळगाव जोगा (4 मेंढ्या), साळवाडी (1 शेळी, 8 मेंढ्या),
उदापूर (14 मेंढ्या), शिरोली बुद्रुक (5 मेंढ्या), कुसुर (12 मेंढ्या), मंगरूळ (16 मेंढ्या), साकोरी (10 मेंढ्या), बोरी शिरोली (7 मेंढ्या), पिंपळवंडी (27 मेंढ्या), बोरी शिरोली (7 मेंढ्या), पिंपळवंडी (27 मेंढ्या), बोरी बुद्रुक (6 मेंढ्या), पिंपळगाव तर्फे नारायणगाव (2 मेंढ्या).
पाऊस व थंडीमुळे गारठून माझ्या 26 मेंढ्या मृत झाल्या. यामध्ये पाच मेंढ्या गाभण होत्या. यामुळे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले असून काही मेंढ्या अत्यवस्थ आहेत.
-गणेश माने, मेंढपाळ पारनेर
आज सकाळीच नुकसानीचा पाहणी दौरा सुरू केला आहे. मृत जनावरांचे पंचनामे करण्याचे, मेंढपाळांना तातडीची आर्थिक व प्रापंचिक मदत करण्याचे आदेश तहसीलदार रवींद्र सबनीस यांना दिले आहेत. तालुक्यात सर्वाधिक 82 मिलिमीटर पाऊस नारायणगाव भागात झाला आहे. अतिवृष्टीमुळे द्राक्ष, कांदा या प्रमुख पिकासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
-अतुल बेनके, आमदार जुन्नर