भोर (प्रतिनिधी)- पुणे – सातारा महामार्गावरील नसरापूर ही कांजळे केळावडे ते हातवे तांभाड, ते कोळवडी जांभळी पर्यतच्या सुमारे 28 ते 30 गांवासाठीची प्रमुख बाजारपेठ आहे. शासनाने भोर, वेल्ह्याच्या सर्व सीमा सील केल्या असतानाही नागरीक बाजार पेठेत रोजच गर्दी करत आहेत.
करोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने नसरापूर ग्रामपंचायतीने पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या समवेत बैठक घेतली. बाजार पेठेबाबत आठवड्याचे नियोजन करुन चार चार गावांचा ग्रुप करुन बाजारपेठेची आचारसंहिता ठरवली असल्याचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले.
नसरापूर बाजारपेठेत किराणा भुसार मालाचे 19 व्यापारी आहेत. कृषि सेवा व पशुखाद्याचे 7, भाजीपाला व फळ विक्रीची 20, औषध विक्रीचे 14 व दूध पुरवठा करणारे 5 व्यापारी आहेत.तहसीलदार अजित पाटील यांच्या सुचनेनुसार तालुक्यातील प्रत्येक गावांत जीवनावश्यक खरेदी साठी ग्रामदूत नेमले आहेत. ज्या त्या ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसेवक याचे नियोजन करत आहेत.
नसरापूर भागातील 28 गावचे नागरीकांनी त्यांना आवश्यक असलेल्या साहित्याची यादी ग्रामपंचायती मार्फत ग्रामदूतांकडे द्यायची आहे. ग्रामदूत विनामोबदला नागरिकांना घरबसल्या किराणा, भाजीपाला, फळे, औषधे, पशुखाद्य, बिबियाने आदी साहीत्य पोहच करणार आहेत. प्रत्येक व्यापाऱ्यांचे मोबाईल नंबर नागरिकांच्या माहितीसाठी गावनिहाय प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले.
नसरापूर ग्रामपंचायतीचे सरपंच व नियोजन समितीच्या मान्यतेनुसार खालील प्रमाणे चालू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे
सोमवार -केळवडे – सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत,
साळवडे – सकाळी 11 ते दुपारी 1,
देगांव – दुपारी 2 ते सायंकाळी 4,
नायगाव – सायंकाळी 4 ते 6.
मंगळवार -कामथडी, कांबरे खेडेबारे, करंदी खे.बा, खडकी या गांवासाठी वरील प्रमाणे.
बुधवार -माळेगांव, सांगवी निधान, मोहरी बु., व उंबरे वरील प्रमाणे.
गुरुवार -केतकावणे, दिडघर, विरवाडी, व जांभळी वरील प्रमाणे
शुक्रवार -मोहरी खुर्द, हातवे खुर्द, तांभाड, व हातवे बु. वरील प्रमाणे
शनिवार -पारवडी, सोनवडी, कुरंगवडी, व सांगवी बु. वरील प्रमाणे
रविवार -नसरापूर व कोळवडी सकाळी 9 ते 2पर्यंत.
वरवे दु.3 ते 5 वा.पर्यंत व कांजळे सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत.