मुंबई : लॉकडाऊन संपल्यानंतर उद्योग सुरू करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 नुसार आचारसंहिता जारी केली आहे.
गेले काही आठवडे लॉकडाऊनमुळे उद्योगसंस्था बंद असल्याने त्यांना आपली आदर्श उत्पादन पध्दती वापरता येणार नाही. काही उद्योग संस्थांमध्ये रसायने शिल्लक राहिलेली असू शकतात. त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. धोकादायक रसायने आणि ज्वलनशील सामुग्रीबाबत ही गोष्ट प्राकर्षाने लागू होते.
राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापनाने केमिकल डिझास्टर 2007 आणि मॅनेजमेंट ऑफ केमिकल (टेररीझम) डिझास्टर 2009 या मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. त्याचबरोबर पेट्रोलियम पदार्थांच्या वाहतुकीच्या टॅकरच्या सुरक्षेसंदर्भातही सुचना केल्या आहेत.