मुंबई – राज्यात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर १४ दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. याबाबत आज किंवा उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषणा करतील, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी
बाळासाहेब थोरात यांनी म्हंटले कि, राज्यात वाढणारी करोना रुग्णसंख्या पाहता १४ दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. आज किंवा उद्या मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील. मुख्यमंत्री याबाबत अंतिम एसओपी करत आहेत. गरीब लोकांना काय दिलासा देता येईल याबाबत सरकार विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच, मागील वर्ष आणि हे वर्ष देखील करोनामध्ये गेले आहे. राज्य संकटात आहे. राजकारणात चढ-उतार होत असतात पण राजकारण हे लोकांसाठी करतो असतो. करोनाचे संकट दूर होवो, अशी प्रार्थना बाळासाहेब थोरात यांनी गुढीपाडव्यानिमित्त केली.
दरम्यान, राज्यातील परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करेल, पण तो करावा लागू नये अशी अपेक्षा आहे. जर त्याआधी आपण करोनाला रोखले तर आम्ही आनंदी आणि समाधानी असू. आम्ही सर्वोत्तम होईल अशी अपेक्षा करत आहोत, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. जेव्हा रुग्णालयांमध्ये गर्दी होऊ लागते, डॉक्टरांची कमतरता जाणवू लागते, औषधांचा तुटवडा निर्माण होतो आणि दैनंदिन रुग्णसंख्येचा सामना करण्यास आपण सक्षम नसतो तेव्हा तत्काळ लॉकडाऊन जाहीर करणे हा नियम आहे. जेणेकरुन आपण सुविधा निर्माण करुन परिस्थितीचा सामना करु शकतो, असे त्यांनी सांगितले.