मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना काही महत्वाच्या घोषणा केल्या. रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या कायक्रम सोहळ्यामध्ये ते बोलत होते.
शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. तसेच, प्रताप गड प्राधिककरण जाहिर करण्यात आलं असून या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याला आपल्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. शिवराय आणि मावळ्यांच्या शौर्याला विनम्र अभिवादन करतो. आज सोहळ्याला आपण उपस्थित आहोत, हे आपलं भाग्य आहे असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
लंडनमधली भवानी तलवार आणि वाघनखं महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सुधीर मुनगंटीवार यांचे त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही यामध्ये आपल्याला मदत करणार असल्याचं देखील शिंदेंनी यावेळी स्पष्ट केलं.
मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शिवराज्याभिषेक सोहळ्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष आहे. शिवरायांच्या विचारांवरच आपल्या सरकारचा कारभार आहे. रयतेच्या हक्कांचं रक्षण करणार हे आपलं सरकार आहे असं देखील मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.