मुंबई : देशात आज कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येत आहे. कारगिल विजय दिवसाला आज 20 वर्ष पुर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईतदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील कारगिल युद्धातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
Paid homage at Shahid Smarak in Mumbai on #KargilVijayDiwas !#कारगिल_विजय_दिवस निमित्त आज शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. pic.twitter.com/yChdFfiAQu
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 26, 2019
मुंबईतील शहिद स्मारकास मुख्यमंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. दरम्यान, तिकडे दिल्लीतील वॉर मेमोरिअरलवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. तर श्रीनगरमधील खराब वातावरणामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नियोजित कार्यक्रमात थोडा बदल करावा लागला.