नवी दिल्ली : मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प आज सादर करत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2020 -2021 चा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर केला. दरम्यान, सर्वसामान्यांनांच्या अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्व सामान्यांना जे हवे आहे ते या अर्थसंकल्पातून देण्यात येणार असल्याचे, अर्थमंत्र्यांनी सांगितले. सर्व सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे आमचे पूर्वीपासून उदिष्ट राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, हवामान बदल विषयक प्रयत्नांसाठी 4400 कोटींची तर पर्यटन क्षेत्रासाठी 2500 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. वाढत्या प्रदुषणाला आला बसविण्यासाठी जास्त प्रदूषण करणारे थर्मल प्लांट बंद करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी योजना करण्यात येईल. यासाठी 3150 कोटींची तरतूद करण्यात आली. येत्या काळात देशातल्या आणखी 4 वस्तूसंग्राहलायांची दुरुस्ती आणि विकास पूर्ण करण्याचे सरकारचे उदिष्ट्य आहे. 5 पुरातन जागांचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.