काठमांडू – नेपालमध्ये गिऱ्यारोहणासाठी गेलेल्या दोन भारतीय गिऱ्यारोहकांचा आज मृत्यू झाला. अतीउंचीमुळे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या दोघांपैकी एका गिऱ्यारोहकाने जगातील तिसऱ्या क्रमांकाचे कांचनगंगा शिखर सर केले होते.
बिप्लब बैद्य आणि कर्तार करार (दोघेही वय 46 वर्षे) हे बुधवारी रात्री चार क्रमांकाच्या कॅम्पपासून वर मरण पावले. या दोघांनाही 8,586 मीटरच्या वर चढाई करणे शक्य झाले नव्हते. त्यांना “हायपोथर्मिया’ (शरीराचे तापमान कमी होणे) आणि “स्नो ब्लाईंडनेस’ (बर्फामुळे येणारे अंधत्व) चा त्रास व्हायला लागला होता. मोहिमेदरम्यान कुणाल वाटेतच आजारी पडला. तर बिप्लबने शिखरावर यशस्वी चढाई केली. मात्र परतीच्या प्रवासादरम्यामान उतरताना त्यांचा मृत्यू झाला, असे नेपाळच्या पर्यटन मंत्रालयाच्यावतीने बेसकॅम्पवर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याने सांगितले.
या दोन्ही गिऱ्यारोहकांना प्रोजेक्ट पॉसिबल टीम लीडर निर्मल आणि त्यांच्या सदस्यांनी4 क्रमांकाच्या कॅम्पवर उचलून आणले. तेंव्हा ते अतीउंचीवरच्या कमी तापमानामुळे आजारी पडले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हे दोघेही पश्चिम बंगालमधील 5 जणांच्या पथकासह माऊंट कांचन गंगा शिखरावरील चढाईसाठी गेले होते. या दोघांव्यतिरिक्त अन्य दोन भारतीय आणि एका जर्मन गिऱ्यारोहकालाही याच भागात अती उंचीवरील विरळ हवामानाचा त्रास झाल्याने त्यांना कॅम्पवर परत पाठवण्यात आले आहे. या पथकातील चिलीचा आणखी एक सदस्य बेपत्ता आहे.