पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावीच्या लेखी परीक्षेला मंगळवार (दि.३)पासून सुरू होत आहे. या परीक्षेला यंदा एकूण 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसणार आहेत. ही परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांने परीक्षा केंद्रात अर्धा तास अगोदर उपस्थित राहणे, असे आवाहन मंडळाने केले आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यात मुलांची संख्या 9 लाख 75 हजार 894 इतकी आहे. तर मुलींची संख्या 7 लाख 98 894 एवढी आहे. 22 हजार 586 शाळांमधील विदयार्थ्यांची नोंदणी झाली आहे. 4 हजार 979 परीक्षा केंद्र असणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 65 हजार 85 विद्यार्थी जास्त असणार आहेत. परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीने मंडळामार्फत एकूण 273 भरारी पथकांची करडी नजर राहणार आहे.