मुंबई – राज्यातील सत्तापेचावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना महाविकासआघाडीने सत्तास्थापनेचे पत्र राजभवनात सादर केले आहे. आमच्याकडे बहुमत असून तातडीने आम्हाला सत्तास्थापनेसाठी पाचारण करावे, अशी मागणी पत्राद्वारे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसने केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरीही त्यांच्याकडे पुरेसे बहुमत नसल्याने आम्ही सत्तास्थापनेचा दावा करत आहोत. आमच्याकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसे बहुमत असल्याने आम्हाला तात्काळ सत्तास्थापनेसाठी बोलविण्यात यावे अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. या पत्रावर शिवसेना विधीमंडळ नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची स्वाक्षरी आहे.
Maharashtra: Congress-NCP-Shiv Sena leaders submitted a letter of MLAs supporting their alliance, to the officials at Raj Bhavan in Mumbai. https://t.co/EAJ1yfLaQR pic.twitter.com/pILIznFPii
— ANI (@ANI) November 25, 2019