नवी दिल्ली : नागरिकांवर करांचा अतिरिक्त भार टाकल्याने सामाजिक अन्याय होतो. त्यामुळे नागरिकांवरील कराचा भार कमी करण्यसाठी सरकारने पावले उचलायला हवीत, असे मत देशाचे सरन्याधिश एस. ए. बोबडे यांनी केले.
प्राप्तीकर अपिल लवादाच्या पायाभरणी समारंभात सरन्यायाधिश बोबडे बोलत होते. अतिरिक्त कर म्हणजे नागरिकांवर केलेल्या सामाजिक अन्यायासारखे आहे. हा अन्याय स्वत: सरकारच करत असते, असे ते म्हणाले.
सरकार एक फेब्रुवारीला आपले अंदाजपत्रक सादर करणार आहे. आंतराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा विकास दर 4.8 टक्क्यांवर आल्याबद्दल नुकतीच टीका केली होती. या पाशर्वभूमीवर बोबडे यांच्या वक्तव्याला महत्व आले आहे.