कुरकुभं ते गुंजखिळा भागात ठिकठिकाणी बंद कामामुळे अपघातांत वाढ
वासुंदे- केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने अहमदनगर ते बारामती महामार्गाचे काम हाती घेण्यात आले असून, या महामार्गावरील कामे बहुतांश ठिकाणी पुर्णत्वास आली आहेत, तर काही ठिकाणी प्रगतीपथावर आहेत. मा, दौंड तालुक्यातील काही ठिकाणी अर्धवट असलेली कामे वाहनधारकांसाठी आणि प्रवाशांसाठी डोकदुखी ठरत आहेत.
हा प्रस्तावित महामार्ग दौंड तालुक्यातील दौंड शहर, बोरावके नगर, कुरकुंभ, जिरेगाव, वासुंदे हद्दीतून जातो; परंतु महामार्गाचे काम सुरू असताना कुरकुंभ, वासुंदे, जिरेगाव येथील शेतकऱ्यांनी या कामास तीव्र विरोध केल्यामुळे महामार्गावरील कामे आहे त्या स्थितीत बंद करण्यात आली आहेत. शेतकरी व लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत जिल्हा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन उर्वरित जमिनीची रीतसर मोजणी करून मोबदला द्यावा, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाकडून अल्प प्रमाणात कार्यवाही झाली. मात्र, मोबदल्याबाबत काही ठोक आश्वासन नसल्याने आणि त्या सूचना केवळ सूचनाच असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने अर्धवट कामे बंद करण्यात आली आहेत. महामार्ग मध्येच खोदला असल्याने रात्रीच्या वेळी हे खड्डे दिसत नसल्याने अपघात होत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर हे काम व्हावे अशी मागणी होत आहे.
- संबधित ठेकेदार किंवा संबधित विभागाकडून रस्ते विकासाच्या कामात सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारे काळजी घेतली नसल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी कामे अर्धवट स्थितीत असल्याने प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. ठेकेदाराने हे काम करताना योग्य ते फलक लावण्यापासून काळजी घेणे आवश्यक आहे.
हरीदास लाळगे, माजी सरपंच, जिरेगाव - भविष्यातील अपघाताचे धोके ओळखून सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेण्याची गरज आहे. अपघाताचा धोका लक्षात घेऊन अवजड वाहनधारकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करणे गरजेचे आहे, तसेच महामार्गाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गे लागणे गरजेचे आहे.
बापुराव धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते, वासुंदे