नवी दिल्ली/ गुवाहाटी : केंद्र सरकारने इशान्य भारतात तब्बल निमलषकरी दलांचे पाच हजार जवान तैनात करण्यात करण्यात आले.
नागरिकत्व सुधारणा विधेयक सादर केल्याच्या निषेधार्थ इशान्य भारतात आंदोलनाचा भडका उडाला आहे. या पाशर्वभूमीवर काश्मिरातील 20 कंपनी (दोन हजार कर्मचारी) इशान्य भारतात पाठवण्यात आले.
अन्य ठिकाणहून 30 कंपनी जवान इशान्य भारतात पाठवण्यात आले. दरम्यान उत्तर सीमावर्ती रेल्वेने 14 गाड्या रद्द केल्या आहेत. त्या बहुतांशी आसाममधून प्रवास करणाऱ्या किंवा सुरू होणाऱ्या होत्या.