आसाममध्ये जाळपोळ करत बंदची घोषण
गुवाहाटी : एकीकडे नागरिकत्व दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. तर, दुसरीकडे देशातील अनेक ठिकाणी या विधेयकाला जोरदार विरोध होताना दिसत आहे. आसाममध्ये विधेयकावरून जोरदार विरोध पाहायला मिळत असून राज्यभरात बंद पाळण्यात आला आहे. आसाममध्ये ‘नो कॅब’ हे स्लोगन रस्त्यांवर आणि भितींवर लावल्याचे पाहायला मिळत आहेत. विधेयकाविरोधात संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या असून, आसामबरोबरच लखनऊमध्येही त्याचा विरोध करण्यात आला.
Assam: Locals stage a protest in Dibrugarh against #CitizenshipAmendmentBill. The Bill was passed in Lok Sabha yesterday. pic.twitter.com/4FlzRJk6U9
— ANI (@ANI) December 10, 2019
नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याने आसाममध्ये बंद पाळण्यात येत आहे. नॉर्थ-ईस्ट स्टुडंट्स ऑर्गनायझेशन आणि ऑल आसाम स्टुडंट्स युनिअनच्या कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आहे. राजधानी गुवाहाटीमध्ये सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. तसेच दिब्रुगडमध्ये रस्त्यावर टायर जाळून हिंसक आंदोलन सुरु करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थी देखील आक्रमक झाले असून हिंसक निदर्शने करत आहेत. स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरुन निदर्शने करत आहेत. मोरिगावमध्ये देखील टायर जाळून आंदोलन सुरु केले आहे.
Tripura: Protest being held in Agartala against #CitizenshipAmendmentBill2019 pic.twitter.com/vi8yWzdceW
— ANI (@ANI) December 10, 2019
दरम्यान, लोकसभेत बहुमताने मंजूर केलेल्या नागरिकत्व सुधारणा विधयेकाची आता राज्यसभेत कसोटी लागणार आहे. राज्यसभेत हे विधेयक मांडण्यात येणार आहे. राज्यसभेत भाजपाच्या सर्वात जास्त जागा असल्या तरी भाजपकडे स्वतंत्रपणे बहुमत नाही. मात्र एनडीएतल्या मित्रपक्षांच्या मदतीने भाजप हे विधेयक मंजूर करून घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे भाजपने आपल्या सर्व खासदारांना राज्यसभेत हजर राहण्यासाठी व्हिप बजावला आहे.