औरंगाबाद : दिल्लीतील निजामुद्दीन मरकजनमधून परतलेल्या नागरिकांनी भीती न बाळगता स्वतः हून पुढे या अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला. दरम्यान औरंगाबादमध्ये कोरोनाचे ११ रुग्ण आढळले असून काल एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबादेतील काही नागरिक दिल्ली येथे मरकजमधून जाऊन आल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे. मरकजमधून जाऊन आलेल्या नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करून घ्यावी असे अवाहन जिल्याधिकाऱ्यानी केले आहे. 0240 2331077 या हेल्पलाईननागरिकांनी संपर्क साधून प्रशासनास तपासणीसाठी सहकार्य करावे. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला आहे.