सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टिप्पणी करू नका
चिंबळी – सर्वोच्च न्यायालयाकडून रामजन्मभूमी तसेच बाबरी मशीद या संवेदनशील विषयावर पुढील काही दिवसांत अंतिम न्यायनिवाडा होण्याची शक्यता आहे, तसेच रविवारी (दि.10) ईद-ए-मिलाद सणसुद्धा सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनय बहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंबळी (ता. खेड) येथील हनुमान मंदिरात शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शांतता कमिटीच्या बैठकीत सर्वांना सूचना देण्यात आल्या. यावेळी यामध्ये कोणत्याही धर्माच्या भावना दुखविल्या जातील, तसेच चुकीच्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून कोणीही करू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टिप्पणी करून न्यायालयाच्या निर्णयाचा कोणीही अवमान करू नये, अशा विविध सूचना देण्यात आल्या.
यावेळी उपपोलीस निरीक्षक बापू जोंधळे, पोलीस हवलदार पी. एन. बनकर, नवनाथ कऱ्हे, पोलीस पाटील मयुरी बनकर-राऊत, मधुकर बहिरट, पोपट बटवाल, बाजीराव बनकर, नागरिक आदी मान्यवर
उपस्थित होते.