रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अतिशय दयनीय अवस्था झालेली होती. रस्त्याने प्रवास करणे कठीण जात होते. अनेकदा रस्त्यांच्या कामाविषयी मागणी करूनही जनतेच्या समस्यांना गांभीर्याने घेतले जात नव्हते. मात्र, आता हे सर्व रस्ते चकाचक होणार असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सध्या सर्वच रस्त्यांची कामे सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग, गावोगावचे रस्ते तसेच वाड्या-वस्त्यांवरील जाणारे रस्ते चकाचक होत असल्याने व काही ठिकाणचे रस्ते पुर्णत्वास येत असल्याने जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे. आमदार शरद सोनवणे यांनी वेगवेगळ्या निधी अंतर्गत रस्त्यांची सर्व कामे मार्गी लावलेली आहेत, यामुळे त्यांच्या कामांची चर्चा व प्रशंसा सोशल मीडियावरून असते. जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका झाला असल्याने तसेच अष्टविनायक जोड रस्त्यांतून ओतूर-ओझर, नारायणगाव आणि जुन्नर-लेण्याद्री ते बनकरफाटा याही महत्वाच्या रस्त्यांची कामे पूर्णत्वास येत असल्याने महामार्गांना सरकारकडून देखील पुरेसा निधी दिला जात पर्यटक, भाविकभक्त, शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, निसर्गप्रेमी यांच्यातूनही समाधान व्यक्त होत आहे.
रस्त्यांची कामे झाल्याने तालुक्याचा विकास होणार आहे, तसेच पर्यटकांची संख्या देखील वाढणार आहे. तालुक्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी रस्त्यांच्या विकासामुळे नक्कीच मदत होणार आहे.
इतर पर्यटन क्षेत्राच्या विकासात आणि तालुक्याच्या विकास खूप मोठा फरक आहे. पर्यटनाच्या दृष्टीने जुन्नर तालुका सर्वांगीण तालुका म्हणून मानला जातो. या तालुक्यात छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असणारा शिवनेरी किल्ला अष्टविनायकातील श्री विघ्नेश्वर गणपती ओझर व श्री लेण्याद्री गणपती, आळे येथील रेडा समाधी, राजा हरिश्चंद्र गड, माळशेज घाट, ओतूरचे श्री कपर्दिकेश्वर मंदिर, संत श्रेष्ठ सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांची संजीवन समाधी, पारुंडे येथील तीर्थक्षेत्र, तसेच वडज येथील श्री खंडोबा मंदिर आणि अशा विविध तीर्थक्षेत्र गड किल्ले लेण्या व निसर्गसौंदर्याने नटलेल्या जुन्नर तालुक्याच्या पर्यटनाबाबत विकासाला रस्ते नसल्याने कुठेतरी खीळ बसली होती.