बारामती (काटेवाडी) –श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग काटेवाडी येथील ग्रामस्थांनी निकृष्ट कामाचा दर्जा होत असल्याने हे काम बंद पाडले. श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम चालू असताना अगोदर ज्या ठिकाणी रस्ता बनवणार आहे त्या ठिकाणातील माती जोपर्यंत तळ कठीण लागत नाही तोपर्यंत उकरून बाजूला करणे महत्त्वाचे आहे तरी देखील त्याप्रमाणे हे काम केले जात नाही व मातीवर तोच मुरूम टाकला जात असल्याने पुढील काळात हा रस्ता खराब होऊ शकतो.
यामुळे काटेवाडीतील ग्रामस्थांनी हा रस्ता अडवला आहे जोपर्यंत या रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे केले जाणार नाही तोपर्यंत हा रस्ता होऊ देणार नसल्याची भूमिका काटेवाडी ग्रामस्थांनी घेतली आहे. माझी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गावातच जर हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवला जात असेल तर दुसरीकडे हा रस्ता कशा पद्धतीने बनवला जात असेल असा देखील सवाल यावेळी ग्रामस्थांनी केला.
यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर काटेवाडीचे सरपंच विद्याधर काटे उपसरपंच श्रीधर घुले तंटामुक्तीचे अध्यक्ष केटी जाधव मार्केट कमिटीचे माजी सभापती संजय काटे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संजय काटे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र काटे सोसायटीचे चेअरमन स्वप्निल काटे शिवसेनेचे सतीश काटे प्रकाश काटे मिलिंद काटे राजेंद्र सोलंकर धनंजय काळे नितीन काटे व इतर ग्रामस्थांनी हा रस्ता निकृष्ट दर्जाचे काम केल्याने बंद पाडला आहे