खडकवासला – मागील आठवडय़ापासून उन्हाचा पारा वाढत आसुन जनता अक्षरशः होरपळून निघाली आहे.त्यासाठी थंडाव्यासाठी मुलांचा ओढा आपसूकच पोहण्याचा तलाव, विहिरी आणि कालव्याकडे वाढला आहे.पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने या कालव्यात व खडकवासला धरण चौपाटीवर अनेकांना आपला जीव घालवल्याच्या घटना या पुर्वी घडल्या आहेत. त्यामुळे खडकवासला परिसरातील मुलांनी धोकादायक विहिरी व कालव्यामध्ये पोहण्यासाठी जाऊ नये आसा सबुरीचा सल्ला खडकवासल्यातील युवा नेते संदिप मते यांनी केले आहे.
खडकवासला भागात पोहण्याची ठिकाणे धोकादायक आहेत .तर लगतच्या गावामध्ये स्वीमिंग टॅकचे भाडे परवडत नसल्याने कालव्या लगतची मुले धोकादायक पध्दतीने कालव्यात व धरणावर पोहण्यासाठी जातात. आणि उंचावरून ऊड्या मारत असल्याचे चित्र दिसत आहे .काहीना पोहता येत नाही तरी सुध्दा पाण्यात पाय सोडून बसतात तर काही पोहण्याचा प्रयत्न करतात .आणि पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडण्याची भीती आहे. खडकवासला परिसरातील मुले पोहण्याचा आनंद घेतात. त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची सुरक्षा, जीवरक्षक नाही. उन्हाचा पारा वाढत असला तरी थंडावा मिळण्यासाठी धोकादायक विहिरी व कालव्याचा सहारा घेऊ नये असे पष्ट संकेत संदिप मते पाटील, विजय मते, पुनम मते, दिपक मते, राहुल मते, अनिल मते या नागरिकांनी सुध्दा दिले आहेत.
प्रशासनाकडून ही दुर्लक्ष
महापालिका हद्दीमध्ये कालव्याच्या दोन्ही बाजुला संरक्षण जाळी नाही. भराव ढासळले आहेत. अनेक युवकांचे प्राण या कालव्यात या पुर्वी गेले आहेत तरी सुध्दा पाटबंधारे व महापालिकेकडून दक्षता का घेतली जात नाही .दुर्घटना घडल्या नंतरच प्रशासन जागे होणार का ? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. पाटबंधारे व महापालिका आधिका-यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही .
शाळा – महाविद्यालयातील मुलांच्या पालकांनीसुध्दा उन्हाळ्यामध्ये मुलांना ज्या ठिकाणी व्यवस्था चांगली आहे .अश्याच पोहण्याच्या ठिकाणावर पाठवावे .कालव्यामध्ये पोहण्यास जाऊ नये .ग्रामीण भागातील पालकांनी सुध्दा मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
– पुजा पारगे , सभापती महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद सदस्य