जमैका -युनिव्हर्सबॉस ख्रिस गेल याने आपला सुर हरपल्यामुळेच यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेत असल्याचे सांगितले आहे. गेलसह यंदाच्या स्पर्धेत जागतिक क्रिकेटमधील अनेक स्टार खेळाडूंनी माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.
गेलनेही माघार घेताना कोणतेही कारण दिले नव्हते. मात्र, गेल्या वर्षी त्याला धावा करण्यात यश आले नव्हते. त्यानंतर त्याच्यावर प्रचंड टीकाही सुरु झाली होती. या वर्षीही आपण टी-20 क्रिकेट फारसे खेळलेलो नाही त्यामुळे मलाच माझ्या कामगिरीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळेच यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळणार नसल्याचे गेलने सांगितले आहे.