मुंबई -भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. यामुळे जुलै 2021 मध्ये निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या 12 आमदारांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे भाजपमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.
तब्बल एका वर्षासाठी आमदारांचे निलंबन करणे हे योग्य नाही. कारण एका आमदाराचे निलंबन करणे म्हणजे केवळ त्या एकट्याचे नव्हे, तर संपूर्ण मतदारसंघाचे निलंबन होते. त्यामुळे त्या मतदारसंघालाही दिलेली ही एकप्रकारची शिक्षाच असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. या निर्णयानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने महा बिघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटलंय असं त्या ट्विट करून म्हणाल्या आहेत.
महा बिघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटलंय..
कायदा- नियम पायदळी तुडवून #bjp १२ आमदारांचे निलंबन केले पण सुप्रीम कोर्टानं निलंबन रद्द केलंय
महा बिघाडी सरकार किती असंविधानिक आणि खुनशी वागतंय हे स्पष्ट झालंय
हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या?
फ्लॉवर नहीं🔥फायर🔥है..!😊— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 28, 2022
”आघाडी सरकारने कायदा नियम पायदळी तुडवून भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले. पण सुप्रीम कोर्टानं निलंबन रद्द केल्याने महा बिघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटलंय.
महा बिघाडी सरकार किती असंविधानिक आणि खुनशी वागतंय हे स्पष्ट झालंय. हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या? फ्लॉवर नहीं फायर है… ! असा पुष्पा मधील डायलॉग घेऊन वाघ यांनी सरकारला टोला लगावला आहे
यावर आता सोशलवर मीडियावर युजर्सद्वारे चित्रा वाघ यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. चित्रा वाघ यांना प्रतिउत्तर देण्यात आहे.