मुंबई – महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांमध्ये देखील वेगवान घडामोडी सुरु आहेत. बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपाशी काडीमोड घेत पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे भाजप आणि मित्र पक्षांबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाना उधाण आले आहे. महराष्ट्रातील अनेक नेत्यांनी बिहारमधील राजकारणावर भाष्य केले. त्यानंतर आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी बिहारच्या राजकारणावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
महिला अत्याचाराविरोधात जोरदारपणे आवाज उठवणाऱ्या चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रातील राजकारणाचा दाखल देत एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ म्हणतात,”नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्याला राजकारणातला उध्दव मार्ग म्हणतात…”
नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्याला राजकारणातला उध्दव मार्ग म्हणतात….
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 10, 2022
नितीशकुमार यांनी भाजपासोबत असलेली युती तोडून राष्ट्रीय जनता दल (राजद) तसेच इतर मित्रपक्षांना सोबत घेऊन महागठबंधनची स्थापना केली आहे. नितीशकुमार यांच्यासोबत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनीदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. बिहारमध्ये झालेल्या या मोठ्या राजकीय नाट्यामुळे भाजपचे मित्र पक्षांशी असलेल्या संबंधांबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.