मुंबई – अभिनेत्री उर्फी जावेद व भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यामधील वाद अजूनही सुरूच आहे. उर्फीने ट्वीट करत पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचले आहे. तर चित्रा वाघ यांनी उर्फीला साडी-चोळी भेट म्हणून देणार असल्याचेही भाष्य केले होते. या वादामध्ये आता शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील उडी घेतली आहे. यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ‘महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळविण्यासाठीचं चित्रा वाघ आटापिटा करताहेत’. असा आरोप त्यांनी केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना सुषमा अंधारे यांनी असं म्हंटलं आहे.
यावेळी त्या म्हणाल्या, “महिला आयोगाला दिवाणी न्यायालयाचा दर्जा आहे. महिला आयोगाच्या नोटिशीटी अशी टिंगल उडविलं, यातून तुमची मग्रुरी दिसते. मुद्दा त्या खुर्चीचा आहे त्याचा सन्मान राखला पाहिजे. त्या खुर्चीबद्दल अशा पद्धतीनं बोलत असाल तर वाईट आहे, कदाचित त्यांना खाली खेचून त्या चेअरवर तुम्हाला बसायचंही असेल’. असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
दरम्यान, सुरुवातीला अभिनेत्री ऊर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात वाद होता. त्यात भर पडली रुपाली चाकणकर यांची. आणि याच मुद्द्यावरून आता सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या संपूर्ण राज्यात उर्फी जावेद आणि चित्रा वाघ हे प्रकरण चांगलंच चर्चेत असल्याचं दिसून येत आहे.