बॉलिवूडचे महानायक ‘अमिताभ बच्चन’ आणि दाक्षिणात्य सुपरस्टार ‘चिरंजीवी’ यांचा आगामी ‘सैरा नरसिम्हा रेड्डी’ चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अनेक कलाकरांची मांदियाळी पहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांना आता या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, चित्रपटानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत अमिताभ बच्चन यांना चिरंजीवींच्या राजकारणा बद्दल प्रश्न विचारला असता बिग बींनी मोठा खुलासा केला आहे. ‘मी चिरंजीवी यांना राजकारणात न जाण्याचा सल्ला दिला होता, मात्र चिरंजीवी यांनी ते ऐकलं नाही’. तसेच अभिनेता पवन कल्याण आणि रजनीकांत यांना देखील मी हेच सांगितलं होत.
‘सैरा नरसिम्हा रेड्डी’ हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबरला हिंदीसह, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्ल्याळम या चार दाक्षिणात्य भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आंध्र प्रदेशातील एका लढाऊ योद्ध्याची कथा ‘सैरा नरसिम्हा रेड्डी’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.