पुणे – चिपळूणमध्ये 2018 साली झालेल्या जोरदार पाऊस आणि पाण्याचा प्रवाह यामुळे येथील तिवारी धरण फुटल्याने 30 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. याच धरणाच्या खालच्या दिशेला असलेल्या फणसवाडी या गावाला जोडणारा एकमेव पूल यावर्षी पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामूळे तुटला होता.
यामुळे गावात सुमारे 40 लोक अडकले होते. वाहतूक, आपत्कालीन वैद्यकीय सेवा खंडित झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
नागरी प्रशासनाने केलेल्या विनंतीनंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) एका पथकाने गावांतील सर्व नागरिकांची मंगळवारी सुखरूपपणे सुटका करत त्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले.