नवी दिल्ली: करोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठीची उपाय योजना म्हणून सरकारने तब्बल 1,769 जहाजांमधील 57 हजार प्रवाशांना भारतीय किनाऱ्यावर उतरण्याची परवानगी नाकारली आहे. यातील बहुतेक जहाजे चीनची आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या जहाजांमधील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
“कोविड -19′ चा आणखी फैलाव रोखण्यासाठी सर्व सावधगिरी बाळगून नियोजन केलेल्या नियमांनुसार मालवाहतुकीच्या जहाजांना बंदरांमध्ये हाताळले गेले आहे.
27 जानेवारी ते 21 एप्रिल दरम्यान 21,769 मालवाहतूक जहाजे भारतीय बंदरांवर पोहोचली. यापैकी 1,401 जहाजे प्रमुख बंदरांवर पोहोचली आणि त्यांना आयात-निर्यातीचा माल चढवणे-उतरवण्यासाठी नांगर टाकण्याची परवानगी दिली गेली आहे. या सर्व जहाजांवरील 56,727 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना कोणतेही दैनंदिन पास किंवा किनाऱ्यावर उतरण्याचे पास दिले गेलेले नाहीत.