नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यांपासून भारत-चीन दरम्यान अभूतपूर्व तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तणावपूर्ण परिस्थितीबाबत संसदेमध्ये माहिती दिली आहे.
संरक्षण मंत्र्यानी यावेळी, ‘लडाखमधील भारताची ३८ हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन अनधिकृतपणे चीनने बळकावली आहे. त्याशिवाय १९६३ साली तथाकथित सीमा करारांतर्गत पाकिस्तानने POK मधील ५,१८० स्क्वेअर किलोमीटरचा भूभाग बेकायदरित्या चीनकडे सोपवला.’ अशी माहिती दिली.
सीमाप्रश्नावर शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून निष्पक्ष, परस्पर सहमतीने समाधान निघू शकते असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी बोलून दाखवला.
जैसा कि यह सदन अवगत है चाईना, भारत की लगभग 38,000 square km भूमि का अनधिकृत कब्जा लद्दाख में किए हुए है। इसके अलावा, 1963 में एक तथाकथित Boundary-Agreement के तहत, पाकिस्तान ने PoK की 5180 square km भारतीय जमीन अवैध रूप से चाईना को सौंप दी है: रक्षा मंत्री
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) September 15, 2020
भारत-चीन या दोन्ही देशांना सीमाप्रश्न सोडवण्यासाठी संयमाची आवश्यकता असल्याचे मान्य असून हा प्रश्न एक जटिल मुद्दा आहे हे भारत आणि चीन दोघांनी औपचारिकरित्या मान्य केले आहे. असंही सिंह म्हणाले.