काठमांडू – भारताचा महत्त्वाचा शेजारी असलेल्या छोट्याशा नेपाळमध्ये महासत्ता असलेल्या चीनने आपल्या कारवाया गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढवल्या आहेत नेपाळमध्ये कार्यरत असलेल्या शेकडो कॉल सेंटरच्या माध्यमातून सध्या चीन हालचाली करत आहे गेल्या आठवड्यात राजधानी काठमांडूमध्ये एका कॉल सेंटरवर धाड टाकण्यात आली तेव्हा अनेक चिनी नागरिकांना अटक करण्यात आले त्यानंतर हे कारस्थान उघडकीस आले नेपाळ पोलीस प्रशासनाने देशभर कॉल सेंटरच्या विरोधात कारवाया सुरू केल्या असून आतापर्यंत अनेक लोकांना अटक करण्यात आली असून शेकडो मोबाइल्स आणि लॅपटॉप आणि संगणक संच जप्त करण्यात आले आहेत.
काही चिनी नागरिकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईत पाचशेपेक्षा जास्त लॅपटॉप 700 पेक्षा जास्त संगणक दोन हजार पेक्षा जास्त मोबाईल आणि 500 पेक्षा जास्त सिमकार्ड ताब्यात घेण्यात आली आहेत साधारणपणे नेपाळमध्ये येणारे चिनी नागरिक प्रथम एखादे घर किंवा फ्लॅट भाड्याने घेतात आणि त्या ठिकाणी अनधिकृतपणे कॉल सेंटर सुरू करतात त्या कॉल सेंटरच्या माध्यमातून हेरगिरी आणि इतर अनेक आर्थिक गैरव्यवहार केले जात असल्याचा संशय आहे लोकांनी याबाबत काही तक्रार करू नये म्हणून काही कॉल सेंटरमध्ये स्थानिक नेपाळी तरुणांनाही नोकरी दिली जाते.
या सेंटरच्या माध्यमातून भारत विरोधी कारवाई करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे उघडकीस आले आहे भारतातील सोशल मीडियावर लक्ष ठेवून त्याबाबत वातावरण निर्मिती करणे किंवा चुकीची माहिती प्रसारित करणे अशा प्रकारच्या कारवाया कॉल सेंटरच्या माध्यमातून केले जात असल्याचे उघडकीस आले आहे भारतातील बहुतांशी नागरिक चिनी बनावटीचे मोबाईल वापरत असल्याने त्या तंत्रज्ञानाच्या आधारेच भारतीय नागरिकांची माहिती मिळवून त्यांना त्रास देण्याचे काम या कॉल सेंटरच्या माध्यमातून केले जात आहे शिवाय ऑनलाइन जुगार बँक गैरव्यवहार आणि इतर अनेक बेकायदेशीर गोष्टी सुद्धा त्या कॉल सेंटरच्या माध्यमातून घडवल्या जात आहेत पोलीस प्रशासनाने ही गोष्ट भारतीया अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिल्यावर आता भारतीय प्रशासनही सतर्क झाले आहे