नवी दिल्ली -करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याची गरज सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केली. त्यासाठी बालकांना संसर्ग झाल्यास ते स्वत:हून रूग्णालयांत जाणार नाहीत, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.
करोनाची तिसरी लाट बालकांसाठी अधिक अपायकारक असण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. बालकांना संसर्ग झाल्यास पालकांना त्यांना रूग्णालयांत घेऊन जावे लागेल. त्यामुळे पालकांना असलेला संसर्गाचा धोकाही वाढेल ही बाब विचारात घ्यावी लागेल, असे न्यायालयाने म्हटले.