मुलांना करोनापासून वाचवण्यासाठी लस या वर्षी उपलब्ध होणार नाही. कोविड टास्क फोर्सच्या संशोधन टीमच्या मते, कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान मुलांवर केलेल्या संशोधनामुळे हे सिद्ध झाले आहे की सध्या दोन ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना जास्त धोका नाही. म्हणूनच 2022 च्या पहिल्या तिमाहीत या वयातील मुलांना लसीकरण करावे असे ठरवले गेले आहे. संशोधन पथकाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयालाही याची शिफारस केली आहे.
देशातील मुलांनाही लस दिली जाण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. 18 वर्षांपर्यंतच्या किशोरवयीन मुलांना लागू करण्यासाठी लस चाचण्या करण्यात आल्या आहेत. परंतु या दरम्यान, आयसीएमआरची लसीकरण संशोधन टीम आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय कोविड टास्क फोर्स टीमच्या काही वेगळ्या शिफारसी आहेत.
या संघाचे अध्यक्ष डॉ.एन.के.अरोरा म्हणतात की, मुलांना करोनावरील लस या वर्षी दिली जाणार नाही. पुढील वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान मुलांना लस देण्याचा पूर्ण प्रस्ताव आहे. याचे कारण स्पष्ट करताना डॉ.अरोरा म्हणाले की, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की मुलांना त्यांच्या पालकांइतका करोनाचा धोका नाही. हेच कारण आहे की भारत सरकार डिसेंबरच्या अखेरीस देशातील सर्व स्तरातील नागरिकांचे लसीकरण करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करीत आहे.
डॉक्टर एन. के. अरोडा यांच्या म्हणण्यानुसार कोणतीही आणीबाणी नसल्यास, 2022 च्या जानेवारी ते मार्च दरम्यान दोन ते 12 आणि 13 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले जाईल. जोपर्यंत मुलांना पूर्णपणे लसीकरण केले जात नाही तोपर्यंत शाळा उघडल्या जाणार नाहीत, अशी सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. जर शाळेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण केले गेले असेल तर मुलांसाठी शाळा उघडण्यास कोणतीही अडचण येऊ नये. परंतु हा सर्व निर्णय संबंधित राज्यांवर अवलंबून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशातील लसीकरणाच्या संपूर्ण व्यवस्थेवर देखरेख करणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉ एन.के.अरोडा म्हणतात की, डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण देशात लसीकरण मोहीम पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. सध्या भारतासह जगातील विविध देशांमध्ये तयार केलेली लस लागू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
काही लसींसाठी चाचणी चालू आहे. प्रत्येकाने डिसेंबर अखेरपर्यंत ही लस घ्यावी. त्यानंतर, दोन वर्षांपासून ते 18 वर्षे वयोगटातील मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये लसीकरण मोहीम सुरू केली जाईल. डॉ.अरोरा यांच्या मते, यावेळी काही राज्यांमध्ये परिस्थिती डॉक्टरांकडून अंदाज केल्याप्रमाणे चांगली नाही, परंतु हळूहळू या राज्यांमध्येही परिस्थिती सामान्य होईल.