नवी दिल्ली – देशातील करोनाची स्थिती वाईटकडून अत्यंत वाईटकडे गेली आहे आणि हीच चिंतेची बाब आहे आरटी पीसीआर चाचण्या करण्यावर भर देण्याचा सल्ला देत तातडीने विलगीकरण, संपर्कातील व्यक्तींची चाचणी आणि आरोग्य सेवा सुधारण्याचा सल्लाही त्यांनी राज्यांना दिला. देशातील सर्वाधिक बीादत आढळणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बंगळुरू शहर, नांदेड, दिल्ली आणि अहमदनगरचा समावेश आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट अतिशय तिव्र स्वरूपात पसरत आहे. या लाटेत प्रामुख्यान तरूण पिढी देखील लवकर बाधित होत असून जिल्ह्यात एका चिमुकलीला कोरोनाची लागण होवून तिचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे.
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना अवघ्या २९ दिवसांच्या कोरोनाग्रस्त बाळाचा आणि ६ महिन्यांच्या मुलीचा २९ मार्च रोजी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीय आहे. या घटनेबाबत वृत्त पत्राने दिलेल्या माहितीनुसार, २९ दिवसांचे बाळ २८ मार्च रोजी अतिगंभीर अवस्थेत दाखल झाले होते आणि त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णाच्या पालकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली असून, त्याचे वडील कोविड पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. या शिशूला हार्ट डिसिस होता. उपचार सुरू असताना त्यानेही सोमवारी अखेरचा श्वास घेतला. आतापर्यंत केवळ ज्येष्ठांना धोका असल्याचे सांगितले जात होते; परंतु या चिमुकलीच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
तत्पूर्वी,जळगाव येथे दोन वर्षीय बालकाचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारादरम्यान शनिवारी रात्री मृत्यू झाला. या बाळाला मागील आठ दिवसांपासून आजारी होता. त्यास न्युमोनियाची लागण झाल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले होते. मात्र त्याची पहिली कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली. दरम्यान, महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांचा समावेश यात असल्यामुळे महाराष्ट्राने अधिक काळजी घेणे व उपाय योजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. देशाचा पॉझिटिव्हिटी दर 5.6 टक्के आहे. महाराष्ट्रात साप्ताहिक सरासरी 23 टक्के आहे.