मुंबई – देशासह महाराष्ट्रात करोना व्हायरसने थैमान घातला आहे. लॉकडाऊनमुळे परराज्यातील अनेक मजूर राज्यात अडकून पडले आहेत. अशातच मुंबईतील वांद्रे परिसरातील घटनेनंतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर मनसे महिला पदाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
वांद्रे परिसरात परराज्यातील मजुरांची गर्दी जमल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत राजीनाम्याची मागणी केली होती. यावरून मनसे महिला पदाधिकारी रुपाली ठोंबरे यांनी ट्विटरवरून चांगलाच समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या कि, मुख्यमंत्री साहेब चांगले काम करत आहेत. पण जर महाराष्ट्रचं काही वेडवाकडं (नुकसान) करण्याचा प्रयत्न केलात तर मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे हे लक्षात ठेवा. ते विनंती नाही करत थेट जाळ काढतात. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहायचे नाही, असा थेट इशारा देत रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री साहेब चांगले काम करत आहेत पण जर महाराष्ट्रच काही वेडवाकड (नुकसान) करण्याचा प्रयन्त केलात तर मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव #राज_ठाकरे आहे हे लक्षात ठेवा,
ते विनंती नाही करत थेट जाळ काढतात . 🔥🔥महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पहायचे नाही@AUThackeray@AjitPawarSpeaks pic.twitter.com/T0a6uWbIRj— Rupalipatilthombare (@Rupalipatiltho1) April 15, 2020
दरम्यान, करोनाच्या संकटकाळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सर्व मतभेद दूर करत एकमेकांना मदत करत आहेत. अनेक वेळा उद्धव ठाकरे यांनी राज मला दिलासा आणि सूचना हे दोन्ही देत असल्याचे सांगितले आहे.