लखनौ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील कोविड मृतांचे आकडे लपवले, असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, एकूणच कोविड काळात या सरकारने आकड्यांची मोठी लपवालपवी केली आहे.
त्यांनी या कठीण काळात लोकांनाही काही मदत केली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. राज्यात पंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेत केवळ तीन शिक्षक कोविडमुळे मरण पावल्याचे या सरकारने म्हटले होते, पण शिक्षकांच्या संघटनेने कोविडमुळे या काळात मरण पावलेल्या शिक्षकांची एक यादीच प्रसिद्ध केली असून, ती संख्या सोळाशेच्यावर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या सरकारने पहिल्यापासूनच कोविड आकडेवारीविषयी सर्वच पातळ्यांवर लपवालपवी केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.