मुंबई – मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपामुळं संपूर्ण देशातील राजकारण ढवळून निघालं आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप सिंग यांनी केला होता. त्यावरून राष्ट्रवादीने देशमुख यांचा राजीनामा न घेता या प्रकरणाच्या चौकशीची भूमिका घेतली. दुसरीकडे सिंग यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावलं आहे.
मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन.
सत्यमेव जयते… pic.twitter.com/f2oJjFhO8A— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 24, 2021
यातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. राज्य शासना्च्या या निर्णयानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत ‘दूध का दूध, पाणी का पाणी करावे’, असं म्हटलं आहे
नेमकं काय म्हणाले अनिल देशमुख
‘मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते…’