मुंबई – विद्या आणि कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाचं घरोघरी मोठ्या उत्साहात आगमन झालं आहे. अर्थातच आज पासून गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी परंपरागत गणेशोत्सवाचं चित्र काहीसं पालटलेलं आहे. अर्थातच याला कारण ठरत आहे ती म्हणजे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळं उदभवलेली आव्हानाची परिस्थिती.
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘कोरोनाच्या विघ्नातून राज्याला लवकरात लवकर मुक्ती मिळो…’ असं साकडं गणरायाला घातलं आहे.
तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो अशी प्रार्थना केल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेला श्री गणेश आगमनाच्या पुर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. (२/२)
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 21, 2020
उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. ‘श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षी प्रमाणे यंदाही करत आहोत, मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी. अशा आशयाचे ट्विट मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.