मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. येणाऱ्या मार्च महिन्यात मुख्यमंत्री अयोध्येला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हि माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली. यापूर्वी देखील संजय राऊत यांनी मुख्यमंत्री अयोध्येला जाणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता कार्यक्रम निश्चित केल्याचे बोलले जात आहे.
“सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच! प्रभू श्रीरामाची कृपा. सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील” असे ट्विट राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत म्हणाले, शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना सोबत घेऊन आम्ही अयोध्येला जाणार आहोत तसेच आम्ही काँग्रेसला सुद्धा सोबत येण्यासाठी आवाहन करत आहोत. अयोध्येला जाणे यामागे कोणताही राजकीय हेतू नसून हा आमच्या श्रद्धेचा मुद्दा असल्याचे राऊत म्हणाले.
सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच!
प्रभू श्रीरामाची कृपा.
सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील .श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील— Sanjay Raut (@rautsanjay61) January 22, 2020