पाचगणी (प्रतिनीधी) : जावळीच्या दुर्गम व डोंगराळ जनतेच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्याकरीता जावळी तालुक्यांतील करहर व कुडाळ जिल्हापरीषद गटाच्या सर्वसामान्य जनतेच्या हालआपेष्टा समोर ठेवुन शिवसेनाचा आमदार असताना महू- हातगेघर धरणाचा श्रीगणेशा आता ठाकरे सरकारच्या माध्यमातुन पुर्णत्वाला गेला आहे . जावळी तालुक्याचा माजी आमदार म्हणुन केलेले प्रयत्न पुर्णत्वाला गेले आहे. राज्यांतील ठाकरे सरकारच्या माध्यमातुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित लवकरच महु हातगेघर धरणाचा लोकापर्ण सोहळा घेणार असल्याची भीमगर्जना जावळीचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी केली आहे .
जावळी तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी महू- हातगेघर धरणाच्या बाधकामाकरीता जावळीचा आमदार म्हणुन माझ्याकडुन मुहर्तमेढ 1996 साली रोवली गेली आहे . शिवसेनेने महू- हातगेघर करीता सदैव पाठपुरावा ठेवला आहे . कुडाळ व करहर गटातील 13,0000 हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे . माजी आमदार सदाशिव सपकाळ याच्या मध्यमातुन अत्यंत महत्वाचामहू- हातगेघर धरणाचा प्रयत्न केला असल्याचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी सांगितले .
जावळीच्या कष्टकरी जनतेच्या हालआपेष्टांना हात थांबा मिळेल . चार ते पाच महिन्यात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन महू- हातगेघर जावळी धरणाचा प्रश्न मार्गी लावणाराच अशी ग्वाही जावळीकरांना देत , महाविकास आघाडी सरकारच्या कुटुंबप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे याच्याप्रमुख उपस्थितीत महु हातगेघर धरणाचा लोकार्पण सोहळा पार पाडणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
दरम्यान, जावळी तालुक्यातील बोडरवाडी धरणाचा प्रश्न भिजत घोघड होवुन पडला असताना शिवसेनेचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी महू- हातगेघरचा महत्वाचा प्रश्न कोणत्याही परिस्थीत येत्या चार-पाच महिन्यात मार्गी लावणार असल्याची भिमगर्जना जावळीकरांच्या धरणाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने जावळीत धरण बांधणीवरुन शिवसेनेने धेतलेले शिवधनुष्य पेलनार का ? हे मात्र येणारा काळच ठरवेल.