नागपूर: राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे आमच्या सरकारची मार्गदर्शिका असून कमी बोलून जास्त काम करायचे असे आम्ही ठरविले आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील ‘संताचा तो प्रचार अमर, अजूनही लोक-मनावर, राज्य चालवोनी निरंतर, लाखो जीवा उद्धरितो’ या ओव्यांनी सरकारची पुढची वाटचाल स्पष्ट केली.
तसेच मुख्यमंत्री म्हणाले “कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा शब्द मी नवीन आणतोय आणि तो माझ्या महाराष्ट्राचा भूभाग हा माझ्या महाराष्ट्रात आणला पाहिजे.”