माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
कराड – सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीमध्ये आपद्ग्रस्तांना मदत पोहोचवण्यात भाजप सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. ते झाकण्यासाठीच फडणवीस सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पूरस्थितीत या सरकारचे आपत्ती व्यवस्थापनचे मंत्रीच जागेवर नव्हते, यावरून सरकारला पूरस्थितीचे कितपत गांभीर्य होते, ते स्पष्ट होते. या पूरस्थितीला सरकारच जबाबदार असून मुख्यमंत्री सरळसरळ खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी येथील विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, महाराष्ट्रात आर्थिक मंदी असून रोजगाराची स्थिती बिकट आहे. याचा फटका जनतेला बसत असला तरी त्याकडे सरकारचे लक्ष नाही. सातारा जिल्ह्यात यंदा 700 ते 800 टक्के पाऊस झाल्याची खोटी माहिती मुख्यमंत्री फडणवीस देत आहेत. कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांकडून घेतलेल्या
(पान 5 वर)
लोकशाही की ठोकशाही
लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर सरकार काहीही बोलत नाही. मात्र, धांदात खोटी आकडेवारी सांगत लोकांची फसवणूक करत आहे. राज्यघटना पायदळी तुडवली जात आहे. या सरकारची भूमिका लोकशाहीची आहे की, ठोकशाहीची, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे आ. चव्हाण म्हणाले.