नवी दिल्ली – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal ) यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावेळी विधानसभेत गदारोळ केल्याच्या कारणावरून भाजप आमदारांना विधानसभेतून मार्शल्स करवी बाहेर काढण्यात आले.
वर्गखोल्यांचे बांधकाम आणि उत्पादन शुल्क धोरणांतील गैरव्यवहार, केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालासह विविध मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी सभागृहात चर्चेची मागणी हे आमदार करीत होते, पण त्यांची मागणी उपसभापती राखी बिर्ला यांनी अमान्य केल्यानंतर ते अध्यक्षांच्या आसनापुढील मोकळ्या जागेत येऊन गोंधळ घालू लागले तेव्हा राखी बिर्ला यांनी त्यांना दिवसभरासाठी सभागृह सोडून जाण्याचा आदेश दिला, पण त्यांनी तो मानला नाही, त्यानंतर त्यांना सभागृहातून मार्शल्सना बोलावून बाहेर काढण्यात आले.
या संबंधात उपसभापती राखी बिर्ला यांनी म्हटले आहे की, सरकारवरीवल विश्वासदर्शक ठरावाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. विरोधी सदस्यांनी सभागृहाचा आदर केला नाही त्यामुळे त्यांना बाहेर काढावे लागले. (Chief Minister Kejriwal expelled the rioting BJP MLAs from the assembly)