जयपूर – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दोन दिवसांच्या चिंतन शिबिरात मंत्र्याच्या कामाचा तसेच सरकारने गेल्या चार वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला. या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, गेल्या चार वर्षाच्या सरकारच्या काळात कॉंग्रेसने जाहीरनाम्यात दिलेल्या सर्व घोषणांची पूर्तता केली आहे असे त्यांनी नमूद केले. बहुतेक मंत्र्यांनी चांगली कामगिरी केली आहे. केलेले काम एकूणच समाधानकारक आहे, असे ते म्हणाले.
आपल्या मागील सरकारच्या कार्यकाळातही आपल्या सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी असा उपक्रम घेण्यात आला होता असे ते म्हणाले.
Shiv Sena Symbol Crisis : ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा तारीख पे तारीख!आता ‘या’ तारखेला होणार सुनावणी
गहलोत यांनी प्रत्येक विभागाची माहिती त्या खात्याच्या सचिवांकडून न घेता त्या खात्याच्या मंत्र्यांकडूनच घेतली. यावेळी राज्यातील भविष्यातील योजनांवरही चर्चा झाली असे ते म्हणाले.